Total Pageviews

आजचा दिवस माझा - सर्वसामान्य गोष्टीसाठी केलेली असामान्य धडपड

 
 
 
 
आजचा दिवस माझा - सर्वसामान्य गोष्टीसाठी केलेली असामान्य धडपड

सचिन खेडेकर (मुख्यमंत्री ) ,अश्विनी भावे (सौ .मुख्यमंत्री ) ,  रिषीकेश जोशी (personnel assistant)   ,महेश मांजरेकर ( IAS ऑफिसर) ,आनंद  इंगळे ,पुष्कर ,लीना भागवत ( अधिकारी वर्ग )  अशी तगडी स्टार कास्ट ह्या सगळ्यांच्या अभिनयाविषयी मी काय बोलावे
चंद्रकांत कुलकर्णी ह्याचा दिग्दर्शन लहान लहान प्रसंगातून सुद्धा छाप उमटवून जातं , सध्यस्थिती वास्तवाशी थोडाफार फारकत असलेला चित्रपट जरी असला तरीसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीने काहीही अशक्य  नाही हा संदेश देण्यात चित्रपट कुठेच कमी पडत नाही किंबहुना दाखवून देतो कि राजकीय इच्छाशक्तीने काय शक्य आहे .
चित्रपटामधील घडामोडींचा काळ फक्त एका दिवसाचा ,त्यातून मुख्य कथानक दुपारी ३ ते पहाटे ६  इतक .
राजकीय इच्छाशक्तीने प्रेरित मुख्यमंत्री , त्यांची जमेल तितक स्वच्छ प्रशासन देण्याची धडपड त्याजोगे करावं or else केलेल राजकारण ,स्वामी निष्ट पत्नी , विश्वासू तसेच संवेदनशील स्वीय सहायक ,सोबत सरकारी कर्मचारी वर्ग काम म्हणजे उपकार ह्याभावनेतून काम करणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे UPSC मधून आलेला IAS अधिकारी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे बदली आणि त्यातून आलेला  माज, एक प्रामाणिक पत्रकार ह्या सगळ्यांना सोबत पूर्ण एक दिवसाची  कथा .
मुख्यमंत्र्यांच संवेदनशील मन त्यांना  खटकलेली एक गोष्ट आणि मग ती पूर्ण करण्यासाठी केलेला रात्रीचा दिवस हि कथेची बांधणी खूप अप्रतिम आहे ,चित्रपटाच्या मूळ गाभ्याच्या सोबत चित्रपट पुढे सरकत असताना सुद्धा दैनदिन राजकीय घडणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केलेला नाहीये ,त्या लहान सहान घटना त्यांचे अस्तित्व दाखवतात  
मुख्यमंत्री - IAS ऑफिसर ह्याचं संभाषण ,मुख्यमंत्र्यांच विविध प्रसंगावर केलेल भाष्य , मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी ह्याचं संभाषण , स्वींय सहायक आणि त्याच्या मुलाचं संभाषण ,सौ  मुख्यमंत्री यांनी घेतेलेला निर्णय वर्तमान काळातील शासन प्रशासनावर अचूक भाष्य  करून मनाचे ठाव घेतात ,विचार करायला भाग पाडतात 
नेहमी सारखा गोड गोड शेवट न घेता , समर्पक शेवट आहे तो असा कि एक चांगल काम करून सुद्धा अजून भरपूर काम शिल्लक असल्याची दाखवलेली जाणीव 
वर्तमान स्थिती पाहता  हा चित्रपट वास्तववादी नाही वाटला तरीसुद्धा एक वेगळी सकारात्मक विचारसरणी रुजवून जातो . कधी कधी फायदे तोटे ,राजकारण न पाहता कुणीतरी कुणासाठी झटलेल पहिल कि समाजकारणासाठी प्रशासन अस्तित्वात येण्याची आस लागते 
जनता ,शासन ,प्रशासन ह्यांनी सर्वांनी एकदा तरी पाहावा असा चित्रपट
 
( चित्रपटाच्या कथेबद्दल मुद्दाम detail मध्ये सांगत नाही कारण theatre मध्ये पाहावा अशी इच्छा )

एक नवा अध्याय लिखाणाचा...

नवीन वर्षाची सुरुवात झाली कि किरणदादा हमखास एक नवीन डायरी आणून देतो तसेच नवीन नवीन पेन घेण्याची खूप हौस, गेल्या  ३ वर्षाच्या नवीन नवीन डायऱ्या आणि खूप सारे पेन्स जमले होते हे सर्व सार्थकी लावायच होतच त्यातून एक मस्त किस्सा घडला कि लिहायची सुरुवात करावी लागली
       बस च्या पावसामध्ये गाणी ऐकणं आणि लोकल च्या प्रवासामध्ये पुस्तक वाचन हि दोन आवडिची  काम संध्याकाळची वेळ  आणि कांजूर to cst उलटा प्रवास  असल्यामुळे लोकल ला तशी फार गर्दी नव्हती  मस्त window सीट  मिळाली नवीन घेतलेलं शोध स्वामी विवेकनंदांचा हे दाभोळकरांच पुस्तक काढलं अनि डोकं खुपसलं इतका तल्लीन झालो होतो कि कधी एक एक स्टेशन मागे पडत होती काही कळत नव्हत ,इतक्यात आवाज आला " पुस्तक खूप छान आहे पण वाचल्यावर चिंतन जरूर कर "मी डोकं वर काढून पहिल एक परिटघडिचा  माणूस बोलत होता मी हो नक्कीच  म्हणालो आणि पुन्हा डोक खुपसनार इतक्यात दुसरा प्रश्न आदळला "तू नेहमी अशी पुस्तकं वाचतोस का तुला sociology ची आवड आहे का ?" अस पटकन मी इतका संवाद साधत नाही पण माणूस बरा वाटला  म्हणून बोलणं चालू ठेवूया अस ठरवलं आणि म्हणालो नाही जे आवडेल , कोणी सुचवेल ते वाचतो लगेच पुढचा प्रश्न "वाचून काय करतोस " मी बोललो काहीच नाही कधीतरी मित्रांसोबत बोलताना share 
 करतो,समजून घेतो ,मनाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात  आणि पुढच्या प्रश्नाची वाट बघू लागलो , तो माणूस विचारात पडल्यासारखा झाला आणि म्हणाला "तुला जे वाटत ते बरोबर असत कशावरून ?  तुमचा काही कट्टा वैगेरे आहे आहे का ? तू ब्लॉग लिहितोस का ?" ह्या सर्व गोष्टींचा कधी विचार केल्याचं आठवेना सुद्धा झाल आणि सहज उत्तर निघालं नाही … त्यावर लगेच त्यांनी बोलायला सुरुवात केली "आपला मेंदू म्हणजे एक कपाट आहे आणि त्यामध्ये असंख्य कप्पे आहेत तू ते कप्पे भरतो आहेस पण ते फक्त भरलेले आहेत ,त्यांचा recycling होणं गरजेचं आहे. तू वाचलेल , त्यावर तुझे विचार ते नमूद करणं आवश्यक आहे , तुला तरी कस कळणार तू वाचलेलं बरोबर आहे कि चूक ,थोडक्यात सांगायचं तर तुला उमजलेलं सर्व काही जसच्या तस बरोबर आहे कि विचारांची दिशा बरोबर कि चूक ? वाचनावर कधीही बंधनं नसावीत पण एक दिशा नक्कीच असावी आणि ती दिशा वाचन संस्कृती जोपासल्यामुळे होते ,वाचन संस्कृती म्हणजे काय ,आपण वाचतो त्याची चर्चा त्यावर समीक्षा त्या अनुषंगाने तुमची कार्यपद्धती "
क्षणभर विचारात पडलो ,बोलत होते ते पटत होतं ,विचारातून बाहेर येवून पाहतो तर माणूस गायब ,इतक नक्की आठवतं कि मध्ये कोणतही स्टेशन आल नाही ,कदाचित माझाच मला झालेला  भास ,माझं मला उमगलेलं उत्तर ,गेल्या काही दिवसांत बरीच वेगवेगळ्या विषयांची पुस्तक वाचनात आली,पण विचारांचा वेगळा गोंधळ जाणवत होता  ,तो का व कशामुळे होता ते नव्हत कळत ,कदाचित त्याच उत्तर सापडत होत… 

खाजगी,कार्यालयीन ,सार्वजनिक आयुष्यात खूप साऱ्या घटना घडत आहेत , त्यावर विचारांची एक माळ गुंफली जातीये ,ती फक्त जपमाळ बनून राहिलीये . या जपमाळेचा काहीच कुठे होत नाहीये ,ह्या जपमाळेचा  योग्य ठिकाणी जप होणं  आवश्यक आहे . रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय "Mind all Reason is knife all edge, it bleeds the hands that hold it.सततच तर्ककर्कश असणारं मन बुद्धी म्हणजे मूठ नसलेलं सुर्‍याचं पातं,जे हात ते पातं पकडतील तेच रक्तबंबाळ होतील" हे मुठ नसलेलं पात होवू द्यायचं नाही । एक विचारांची दिशा कळली आपोआप तर्कवितर्क ह्यांना विराम मिळेल आणि त्याच रुपांतर एका ठराविक विचारसरणी मध्ये होईल 
ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हा अध्याय लिखाणाचा तुम्हा सर्वांच्या सोबतीने  ….