Total Pageviews

काळ बदलला , मालिका सुधारल्या. समंजस पुरुषांच्या परंपरेला सुरुवात

 मातृसत्ताक व्यवस्थेपासून सुरुवात होवून  नंतर  कष्टाची काम करण्याच्या नावाखाली  सत्ता पुरुषांच्या हातामध्ये आली . पुरुषप्रधान संस्कृती सुरु झाली .  सत्ता कोणाचीही असो , समसमान न्याय ,वागणूक अपेक्षित आहे . एकाने  राज्य करायचं आणि दुसऱ्याने फक्त सोसायचं हे चूक 



              म्हणजे मला माझी आई , आजी , हल्लीच्या काळामध्ये मोठ्या बहिणी ह्या सगळ्यांना एकच गोष्ट बोलताना पाहिलंय ऐकलंय . संसाराचा गाडा स्त्रीने हाकायचा ,तिनेच सगळं सोसल पाहिजे . म्हणजे माझ्या घरातील पुरुष मंडळी अन्याय करणारी होती अस नाही पण एक overall so called समाजाची मानसिकता स्त्री ही आदर्श स्त्री'च असली पाहिजे  . ह्यामध्ये मग tv वरच्या मालिकांनी ,चित्रपटांनी कस मागे राहावं . चार दिवस सासूचे मधील अनुराधा असो किंवा आभाळमाया वादळवाट मधील स्त्री व्यक्तिरेखा खूप समंजस आणि सर्व काही सांभाळून नेणाऱ्या म्हणजे थोडक्यात आदर्श वादी .


         काळ बदलला ,विचार बदलला हल्लीच्या मालिकांच स्वरूप सुद्धा बदलतंय . खूप चांगल वाटलं . so called समाजाची मानसिकते पासून फारकत घेत पुरुष सोशिक आणि समंजस दाखवले जाताहेत.


        होणार सून मी ह्या घराची मधील श्रीरंग गोखले , घरामध्ये १ आजी , ६ आया आणि १ बायको . ह्या सगळ्यांना व्यवस्थित समजून घेत . आदर्श नातू ,आदर्श मुलगा तसेच आदर्श नवरा . स्त्रियांच्या त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांना त्यांचे हक्क मिळवून देताना दिसतो .


        जुळून येती रेशीमगाठी मधील आदित्य , बायकोने म्हणजे मेघनाने  सांगितलं पूर्वीच प्रेम . तिला तिच प्रेम, सन्मान मिळवून देण्याची धडपड , त्यासोबतच तिला घरातील सर्वासोबत जुळवून घेण्यासाठी मदत . वेळोवेळी तिची योग्य ठिकाणी योग्य पाठीराखन .


        etv वरील माझे मन तुझे झाले मधील शेखर , अल्लड महाविद्यालयीन तरुणी शुभ्रा , तिला जबाबदारीची जाणीव करून देताना समजून उमजून घेताना होणारी तारेवरची कसरत तरीसुद्धा निखळ प्रेम करणारा .




       ह्या सर्व व्यक्तिरेखांचा एक समान धागा वाटला । बायकोला बायको न समजता एक चांगला मित्र सहचारिणी समजन्याचा   सुज्ञ पणा . बायको म्हणजे हक्क , अस न दाखवता नवरा म्हणजे हक्काची परिपूर्ती असा दाखवला .
 


      ह्या सर्व व्यक्तिरेखा पुरुषांच्या दृष्टीने  कधी कधी खूप आदर्शवादी वाटतात पण विचार करा पूर्वी जेव्हा स्त्रियांच्या व्यक्तिरेखा अश्या आदर्शवादी होत्या तेव्हा आपल्याला अस कधी वाटलं का ?आपण नेहमी अपेक्षा करत आलो पण त्यांच्या अपेक्षांच्या पूर्ततेची कधी व्याख्या तरी जमली का ?



काळ बदलतोय विचार बदलले पाहिजेत मुळात चांगले विचार केले पाहिजेत . बायकांना काय कळत , बायको म्हणजे हक्काची, स्त्री एक भोगवस्तू  हि मानसिकता बदलणं गरजेच झालंय .


समोरून वेडी वाकडी जाणारी गाडी दिसली कि ती गाडी बाईच चालवत असेल हे गृहीत धरन कमी केला पाहिजे . मुळात कोणालाच कधीच गृहीत धरू नये .



मालिकांच बदलेल स्वरूप समजून घेताना आप आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्याला काही अंगिकारता आला तर एक चांगला समाजाच स्वप्न साकार होण्याला नक्कीच मदत होईल . socialist म्हणून विचार करताना समाजातील सर्व घटकांना सर्व समान संधी चा आपण विचार करतो मग घरापासून सुरुवात नको का?
मालिकांच्या लेखकांच  मनापासून कौतुक व शुभेच्छा .