मी तुझ्यासाठी हे केल, तुझ्यासाठी ते केलं आणि तू माझ्यासाठी काय केलं … हि वाक्य सर्रास कानावर पडताना दिसतात .
कोण कोणासाठी का काही करतो ? काय असतात अश्या अपेक्षा कि आपण आपले निर्णय बदलतो आणि त्याग वैगेरे सारखी मोठ मोठाली लेबलं लावून आपले कोणासाठी काही कार्य टाळतो पण इतक करूनही पुढे काय होत …कालांतराने खुश कोणीच नाही म्हणजे ज्याच्यासाठी केला तो सुद्धा नाही आणि ज्याने केला तो सुद्धा नाही
मुळात प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना असते आपण कोणासाठी काहीतरी करावा अशी अपेक्षा असते . मूलतः मानवी गुणधर्माचा एक स्थायी स्वभाव आहे तो .
पण तोच त्याग करताना नेहमी एक सुप्त अपेक्षा आपण बाळगून असतो ते म्हणजे आपण केलेल्या त्यागाची पोचपावती . नेहमी अस वाटत असत कि आपण एक अमुक त्याग केलाय तर मग आपल्या त्या त्यागाची नेहमी ज्याच्यासाठी केलाय त्याने त्या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी , आपल्याशी तस वागावं पण तसं होताना दिसत नाही आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, मनामध्ये' द्वंद चालू होत.
आपण केल तर बरोबर आहे का खरच तसा तो त्याग करण्याची गरज होती का आणि ज्यांच्यासाठी केला खरच आपला त्याग समजून घेणारे आहेत का .
आपण ज्याच्यासाठी त्याग करतो त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण गरजेच आहे . आपल्यासाठी त्याग असेल पण ज्याच्यासाठी करतो त्याच्यासाठी एकतर ती एक साधी अपेक्षा असू शकेल आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची आपल्या आयुष्याशी नाळ समजू न शकल्याने किंवा स्वताच्या मस्तीत धुंद असणाऱ्या व्यक्तीला समोरच्याविषयी काहीच आपुलकी नसेल
आपण जेव्हा एखादी गोष्ट टाळतो व त्या गोष्टीचा त्याग करतो त्या गोष्टीशी किती लोक निगडीत आहेत ह्यावर सुद्धा बऱ्याच वेळा त्या त्यागातून मिळणार समाधान अवलंबून असत.
कारण आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा स्वतःच्या ,स्वतः भोवतीच्या वातावरना मुळे निर्णय घेतो पण त्याचा आपल्या परीघामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा तितकासा विचार करत नाही परिणाम असा होतो त्यामुळे एक जन सुखावतो आणि एक जन दुखावतो .
दुखावलेल्या मनाचा थोडाफार परिणाम आणि ज्याच्यासाठी केल त्याच्या अपेक्षा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि वेळ निघून गेल्यावर कशासाठी आणि कोणासाठी काय केल , खरच गरज होती का असे प्रश्न पडू लागतात . पश्चाताप होवू लागतो
खूप भेळ मिसळ आहे विचारांची त्यागमूर्ती असाव पण मग अपेक्षा करू नयेत अनादिकाळापासून लिहून ठेवलंय कर्म कर फळाची अपेक्षा करू नको पण सामान्य माणूस म्हणून जमणार आहे आपल्याला ??
मुळात त्याग ज्यांच्यासाठी करतोय तो सुद्धा एक सामान्य माणूस असतो त्याच्या जाणीवा जागृत असतील तर करावा त्याग .
कोणाच्या काही करण्याने काही कोणाला फरक पडत नसतो तुमचा चांगुलपणाच कौतुक एक दोन दिवस नंतर तुम्ही जसे पूर्वी होतात तसे मग कोणी सांगितलंय नको ते उपद्याप .
माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगावं . देव बनण्याचा प्रयत्न करू नये
स्वार्थी बना अस मी म्हणत नाहीये पण म्हणून कोणतही शास्त्रीय कारण नसताना कोणाच्या दांभिक सुखासाठी कोणतेही निर्णय घेवू नयेत .
लेख थोडा भरकटला असेल. पण एकच सांगावास वाटत । पश्चाताप न करण्याची शाश्वती असेल तरच निर्णय बदलावेत , त्याग करावा …
कोण कोणासाठी का काही करतो ? काय असतात अश्या अपेक्षा कि आपण आपले निर्णय बदलतो आणि त्याग वैगेरे सारखी मोठ मोठाली लेबलं लावून आपले कोणासाठी काही कार्य टाळतो पण इतक करूनही पुढे काय होत …कालांतराने खुश कोणीच नाही म्हणजे ज्याच्यासाठी केला तो सुद्धा नाही आणि ज्याने केला तो सुद्धा नाही
मुळात प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना असते आपण कोणासाठी काहीतरी करावा अशी अपेक्षा असते . मूलतः मानवी गुणधर्माचा एक स्थायी स्वभाव आहे तो .
पण तोच त्याग करताना नेहमी एक सुप्त अपेक्षा आपण बाळगून असतो ते म्हणजे आपण केलेल्या त्यागाची पोचपावती . नेहमी अस वाटत असत कि आपण एक अमुक त्याग केलाय तर मग आपल्या त्या त्यागाची नेहमी ज्याच्यासाठी केलाय त्याने त्या गोष्टीची सतत जाणीव ठेवावी , आपल्याशी तस वागावं पण तसं होताना दिसत नाही आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो, मनामध्ये' द्वंद चालू होत.
आपण केल तर बरोबर आहे का खरच तसा तो त्याग करण्याची गरज होती का आणि ज्यांच्यासाठी केला खरच आपला त्याग समजून घेणारे आहेत का .
आपण ज्याच्यासाठी त्याग करतो त्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण गरजेच आहे . आपल्यासाठी त्याग असेल पण ज्याच्यासाठी करतो त्याच्यासाठी एकतर ती एक साधी अपेक्षा असू शकेल आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची आपल्या आयुष्याशी नाळ समजू न शकल्याने किंवा स्वताच्या मस्तीत धुंद असणाऱ्या व्यक्तीला समोरच्याविषयी काहीच आपुलकी नसेल
आपण जेव्हा एखादी गोष्ट टाळतो व त्या गोष्टीचा त्याग करतो त्या गोष्टीशी किती लोक निगडीत आहेत ह्यावर सुद्धा बऱ्याच वेळा त्या त्यागातून मिळणार समाधान अवलंबून असत.
कारण आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा स्वतःच्या ,स्वतः भोवतीच्या वातावरना मुळे निर्णय घेतो पण त्याचा आपल्या परीघामध्ये असणाऱ्या व्यक्तींचा तितकासा विचार करत नाही परिणाम असा होतो त्यामुळे एक जन सुखावतो आणि एक जन दुखावतो .
दुखावलेल्या मनाचा थोडाफार परिणाम आणि ज्याच्यासाठी केल त्याच्या अपेक्षा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही आणि वेळ निघून गेल्यावर कशासाठी आणि कोणासाठी काय केल , खरच गरज होती का असे प्रश्न पडू लागतात . पश्चाताप होवू लागतो
खूप भेळ मिसळ आहे विचारांची त्यागमूर्ती असाव पण मग अपेक्षा करू नयेत अनादिकाळापासून लिहून ठेवलंय कर्म कर फळाची अपेक्षा करू नको पण सामान्य माणूस म्हणून जमणार आहे आपल्याला ??
मुळात त्याग ज्यांच्यासाठी करतोय तो सुद्धा एक सामान्य माणूस असतो त्याच्या जाणीवा जागृत असतील तर करावा त्याग .
कोणाच्या काही करण्याने काही कोणाला फरक पडत नसतो तुमचा चांगुलपणाच कौतुक एक दोन दिवस नंतर तुम्ही जसे पूर्वी होतात तसे मग कोणी सांगितलंय नको ते उपद्याप .
माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जगावं . देव बनण्याचा प्रयत्न करू नये
स्वार्थी बना अस मी म्हणत नाहीये पण म्हणून कोणतही शास्त्रीय कारण नसताना कोणाच्या दांभिक सुखासाठी कोणतेही निर्णय घेवू नयेत .
लेख थोडा भरकटला असेल. पण एकच सांगावास वाटत । पश्चाताप न करण्याची शाश्वती असेल तरच निर्णय बदलावेत , त्याग करावा …