Total Pageviews

पतंगराव कदम

पतंगरावांच राजकारण जबरदस्त होत , एका मित्राच्या मामाने त्यांच्या मतदारसंघात सेनेची शाखा काढली , दुसर्या दिवशी घरी पतंगरावांचा माणुस . मिटींग बसली की का काढली शाखा का नाराज आहे ? गल्लीतल्या पोरांना नोकर्या नाहीत , काही प्रकरण पेंडीग होती . तिथ त्या व्यक्तीने शब्द दिला सगळ्यांना लावुया वेळ द्या . वर्षा दोन वर्षात सगळी पोर भारती विद्दापीठात चिकटलेली.

मतदारसंघातून जवळपास ३०-३२ हजार लोक भारती विद्यापीठांमध्ये कामाला कशाला काय सीट जात्या . मग त्यांना वेळ मिळायचा महाराष्ट्रामध्ये आणखी १०-१२ आमदार निवडुन आणायला . 

मुख्यमंत्री पदासाठी दर वेळी नाव असायच पण मिळाल नाही म्हणुन कधी काॅंग्रेस सोडणार म्हणाले नाहीत . 

पवार साहेबांना सांगली मधे खरी टक्कर दिली कदम साहेबांनीच . सांगली मधे काॅंग्रेस च अस्तित्व फक्त कदम साहेबांमुळच आणि थोड फार मदन दादांमुळे सध्याच्या स्थितीत टिकुन आहे हे मान्य करायला पाहीजे . 

एका निवडणुकीला त्यांच्या मतदारसंघात जायचा योग आलेला . ते आले स्टॅंडवर लोक तिथे जमले बोलले आणि गेले झाला प्रचार . नंतर विश्वजित आले घरोघरी फिरले म्हणाले मताधिक्य द्या . एवढा त्यांना त्यांच्या निवडुन येण्याविषयी विश्वास असायचा . 

ह्या जुन्या पिढीतल्या राजकारण्यांच एक होत सर्वसामन्य माणसाला त्यांच्यापर्यत पोचतां यायच , बोलता यायच अडचणी सांगता यायच्या . 

पतंगरावांच्या रुपाने गावची जाण असलेला नेता हरवला ...भावपुर्ण श्रद्धांजली..

No comments: