Total Pageviews

रखमा आजी , दुसरेपण

आमच्या गल्लीत रखमा आजी राहायच्या . दिसायला एकदम देखण्या आणि घर एकटी असून सुद्धा स्वच्छ आणि टाप टिप असायच त्यांच ,  मी आईला विचारलेल की त्यांना कुणी नाहिये का ? आई म्हणाली त्यांना मूल बाळ नाहिये आणि विषय टाळला , मी 11 वी ला होतो .आईने विषय टाळलाय हे लक्षात आलेल पण जास्त विचारल नाही म्हटल मित्र सांगतील डिटेल मधे नंतर पण एक्ट्याच् राहतात म्हणून आदर आणि सहानुभूति वाढलेली नक्कीच . संध्याकाळी मित्रांकडे विचारल की रखमा आजी च काय आहे रे ?
मित्र ज़रा चपापले , एकान खूण केली की नंतर बोलू आणि बाळू कड़े डोळे दाखवले , थोड्या वेळाने बाळू घरी गेला मग संगितलेली हकीकत अशी की ...
बाळूचे आजोबा महादेव ,  रखमा आजीच्या शेतात सालगड़ी होते . महादेव आणि त्यांचीं बायको शेतातल्या घरात राहायचे . चांगल 5-6 एकर उसाच् रान होत . रखमा आजीचा नवरा अर्ध्यावर डाव सोडून पोर बाळ पदरात न टाकता वारलेला  . एकट्या पडलेल्या रखमा आजीला मग तिथे महादेव चा आधार सापडला , महादेव ला पण बाई सोबत पैसा मिळाला आणि मग रखमा आजीच आणि महादेव च प्रेम जुळल . सगळ निवांत चालु होत , रखमा आजीचा नवरा परगावहून तिथे स्थायिक झाल्यामुळे भाऊबंधांचा सुद्धा काही त्रास नव्हता नाहीतर बोंबाबोंब लगेच झाली असती , कदाचित महादेव ने हाच फायदा घेवून रखमा आजीला जाळ्यात ओढली असावी.
महादेव ची बायको सुद्धा घरी बक्कळ पैसा येत होता म्हणून शांत असायची म्हणजे तिची एक प्रकारे संमती होती हया सगळ्याला आणि वरुन जे काही चाललय ते डोळ्यासमोर म्हणून सुद्धा शांत असेल नाहीतर त्या काळी पुरुष अशी अनेक अंगवस्त्रे बाळगून असत ,खायला नसेना का घरी पण एक दोन बायका असणे म्हणजे खरा पुरुषार्थ असा एक समज  सुद्धा होता ,काही ठिकाणी अजुनहि आहे.
काही दिवसांनी ही बातमी महादेव च्या भाऊबंधात समजली , महादेव च्या सासरी छी थू होवू लागली म्हणून मग महादेव शेतातल घर सोडुन आमच्या गल्लीत त्यांच्या जुन्या घरीच राहायला आले. 
रखमा आजी आजारी पडल्याच् निमित्त झाल आणि महादेव ने रखमा आजीला शेतातून बाहेर काढायचा डाव साधला , तिला शेतातून आमच्या गल्लीत तिच्याच् पैशाने घर घेवून राहायला आणल.
आता रखमा आजीच शेत पूर्ण 5 एकर महादेव च्या आयत ताब्यात आलेल आणि रखमा आजी महादेव च्या मर्जी वर जगत होती.
महादेव ची पोर काही शिकली नाहीत ,उसाच् रान फुकटा फाकट मिळून सुद्धा टिकवता आल नाही जसा काळ पुढे गेला , एखाद दोन एकर उरल असेल... महादेव जेव्हा शरीराने थकला तेव्हा मग महादेव च्या बायकोने रखमा आजीवर सूड़ उगवायला चालू केला , बाळूचा बाप आणि चुलते शेत नावावर करून दे म्हणून छळ करू लागले , उपाशी ठेवू लागले.
शेवटच्या दिवसात तर बिचारी उपाशी राहायची , आमच्या ,काकांच्या घरून जेवून जायची . खुप स्वाभिमानी होती बिचारी म्हणून उपाशी झोपायची पण कुणी बोलावल्या शिवाय त्यांच्याकडे जेवायला जायची नाही. 
तिला खर तर शेवटच्या दिवसात रफ़ीक भैया नी खुप जपल , ट्रक ड्राईवर असून म्हणजे एवढा काही पैसा नव्हता पण तरीही घासातला घास दिला , घरी असले की रखमा आजी जेवल्याशिवाय जेवायचे नाहीत.
जात , धर्म कशाचा काही संबंध नसताना माणुसकी म्हणून एका पर धर्माच्या आजीला जपल..
त्या दिवशी संध्याकाळी दंगा एकु आला म्हणून गेलो तर कळले रखमा आजी गेली .. 
अंत्यसंस्कार कोण करणार हा मोठा प्रश्न पडला . रफीक भैया सुद्धा आजारी होते थोड़े दिवस म्हणून पगार सुद्धा झाला नव्हता ते मित्राकडून हात उसने  आणायला चालेल होते पण आम्ही मित्रांनी थांबवल आणि म्हणालो अख्खी गल्ली तिच्या शेतातला उस दिवाळीला फुकट घरसमोर लावत आलीये इतकी वर्ष आता नाही म्हणनार नाहीत.
उस आणताना दाखवलेला हक्क गल्लीने नेमका अंत्य संस्कारावेळी आखड़ला , 10 - 20 रुपये च्या वर कुणी दिले नाहीत. 
कारण काय तर तिने प्रेम केलेले आणि मस्तानी म्हणून जगलेली आयुष्यभर.

साला त्या दिवशी पहिल्यांदा स्वताः च्या कमाई ची जाणीव झाली तेव्हाच ठरवल आपण किमान एवढं कमवल पाहिजे की अश्या एखाद्या प्रसंगी आपला हात परिस्थितीमुळे  आखड़ला नाही पाहिजे.

खर तर मस्तानी म्हणजे बाजीरावांची दूसरी बायकोच पण आपल्याकडे अंगवस्त्र म्हणून उल्लेख होतो.

गल्लोगल्ली महादेव आणि रखमा आहेत पण त्यांचे त्यांच्या म्हातारपणातले हाल न बघवणारे असतात. महादेव सारख्यांचे वंशज फायदा होई पर्यंत बघतात नंतर कुणी नसत .

रफ़ीक भैया सारखे आहेत म्हणून माणुसकी वरचा विश्वास टिकून आहे....

काल अशोक सरांच्या पोस्ट वरुन आठवलेल....

No comments: